जगदीश कोरे (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील मुख्य बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल २३८ कोटी ४३ लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या रकमेचं नुकसान झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अनियमित कर्ज वाटपामुळे बँकेचं एवढ्या कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत."
तत्कालीन संचालक मंडळावर ठपका
राज्य सरकारच्या सहकार विभागाचे निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची प्राकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता सहा वर्षांनंतर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर नुकसानीची जबाबदारी निश्चित कण्यात आहे. या प्रकरणी आता ३२ संचालकांसह दोन अधिकारी आणि एक सनदी लेखापालावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे."
दिग्गज नेते मंडळीच्या अडचणी वाढल्या
सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळी या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निकाल ८ नोव्हेंबरला म्हणजेच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत देण्यात आला होता. त्यामुळे या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. प्राकृत अधिकारी यांनी चौकशी केली असता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांचा समावेश आहे.
"चौकशी अधिकाऱ्यांनी वसूलीचे आदेश दिले
सोलापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या आणि याप्रकरणात दोषी असलेल्या 32 जणांकडून वसुलीचे आदेश देण्यात आले आहे. दिलीप माने, सुधाकर परिचारक, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्राप्पा पाटील, भाजप आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे, चंद्रकांत गणपतराव देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांविरोधात वसुलीचे आदेश काढण्यात आले आहेत ."
अनियमित कर्ज वाटप, ठप्प कर्ज अशी कारणे समोर
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ २०१८ मध्येच बरखास्त करण्यात आले होते. तेव्हापासून बँकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचा कारभार प्रशासकाचा मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बँकेच्या नुकसानीमागे अनियमित कर्जवाटप, ठप्प कर्ज वसुली यांसारखी अनेक कारणं असल्याचं चौकशीत समोर आली आहेत.
नुकसानभरपाईची रक्कम वाटप करण्यात आली
रणजितसिंह मोहिते पाटील- ५५.५४ लाख, दीपक साळुंखे २०.७२ कोटी, राजन पाटील ३.३४ कोटी, रश्मी बागल ४३.२६ लाख, अरुण कापसे २०.७४ कोटी, रामदास हाक्के ८.४१ कोटी, सुधाकर रामचंद्र परिचारक ११.८३ कोटी, सुनील सातपुते ८.४१ कोटी, सिद्रामप्पा पाटील १६.९९ कोटी, दिलीप माने ११.६३ कोटी यांसारख्या अनेकांवर नुकसानीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. संचालक मयत असेल तरी त्यांच्या कायदेशीर वारसदारांकडे रकमेची वसुली करण्याची तरतूद आहे"
0 Comments