जगदीश कोरे प्रतिनिधी,,,बीड: मंत्री धनंजय मुंडे यांयांच्यामर्थकांकडून आपल्याला धमक्या मिळत असून आपल्याबद्दल अशोभनीय वक्तव्यही केली जात आहेत, असा आरोप समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी दमानिया या बीडमध्ये ठाण मांडून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनादरम्यान जिल्ह्यातील पोलीस विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत वंजारी समाजाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले, असे विधान दमानिया यांनी केले आहे. या विधानावरूनच आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
आपल्या विधानाचा छोटासा तुकडा मुंडे समर्थकांकडून समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आला. त्याचप्रमाणे आपला व्यक्तिगत भ्रमणध्नी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला. त्यावरून आपल्याला धमकावण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे कौटुंबिक सहलीच्या वेळचे आपले छायाचित्र प्रसिद्ध करून त्यावर अशोभनीय वक्तव्य करण्यात आली, असा दमानिया यांचा दावा आहे.
0 Comments