जगदीश कोरे (प्रतिनिधी)पुणे: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीबाबत ज्येष्ठ ज्योतिषी विनोद ठक्कर यांनी वर्तविलेले भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे भाकीत अचूक ठरले आहे.
ठक्कर यांनी 31 जानेवारी रोजी समाजमाध्यमांवर पोस्ट करून दिल्ली निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये त्यांनी या निवडणुकीत भाजप विजयी होणार असून त्यांना 46 ते 48 जागा मिळतील, असे वर्तवले होते. प्रत्यक्षात भाजपला 47 जागा मिळाल्या आहेत.
त्याचप्रमाणे ठक्कर यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्या आतीशी यांना उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, आपला परीक्षेचा काळ सुरू झाला आहे. आम आदमी पक्षाला सध्या दिवस चांगले नसून या निवडणुकीनंतर पक्षाला सरकार स्थापन करता येणार नाही. पक्षाचे केवळ 19 ते 23 जागांवर उमेदवार निवडून येतील. प्रत्यक्षात काँग्रेसला 23 जागा मिळाल्या आहेत.
त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ठक्कर यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल. दिनांक आठ रोजी आपल्याला चांगली बातमी ऐकायला मिळेल.
ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते ग्रहताऱ्यांची स्थिती अथवा अन्य कोणत्या शास्त्राच्या आधारे ज्योतिष सांगत नाहीत तर गुरु आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने त्यांना मिळणाऱ्या अंत: प्रेरणेतून ते भविष्य कथन करतात. ठक्कर यांच्या घराण्यात श्रीकृष्ण भक्तीची परंपरा आहे तर ठक्कर हे महाकालेश्वराची देखील उपासना करतात.
0 Comments