नरेश यलगम (प्रतिनिधी). मंगळवेढा.महाराष्ट्रातील स्वराज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती. त्यांचा जन्म शहाजीराजे आणि जिजाबाई या दांपत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर दिनांक १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. जिजाबाईंच्या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती मिळाली. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वीपणे पार पाडल्या. छत्रपती शिवरायांनी हिंदूंवर लाधलेला जिझिया कर रद्द केला. दाभोळला पोर्तुगीजांना तसेच फ्रेंचांना राजापूर येथे वखारी उघडण्यास परवानगी दिली. तसेच राज्याभिषेकाच्या नंतर दिनांक १२ जून १६७४ रोजी इंग्रज आणि महाराज यांत तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इत्यादी व्यवहार करू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. मराठ्यांनी पुरंदर, रोहित, लोहगड, माहुली(शहापूर जवळ) इत्यादी किल्ले घेतले. त्यानंतर महाराजांनी कल्याण भिवंडीचा प्रदेश मिळवला, कारंजा शहरावर चढाई केली. (नोव्हेंबर १६७०). त्यापूर्वीच महाराजांनी आणखी एक मोठा धाडसी उपक्रम केला. तो म्हणजे बागलाण प्रांत (सध्याचा नाशिक जिल्ह्यातील तालुका) ताब्यात घेतला. महाराजांनी विजापूर राज्यावर सन १६७३ मध्ये आक्रमण केले. संधी साधून त्यांनी पन्हाळगड घेतला. दिनांक ६ मार्च १६७३ मध्ये सातारा, परळी, कोल्हापूर इत्यादी स्थळेही त्यांनी जिंकली. सन १६७३ मध्ये सातारा व चाफळ ही शहरे शिवाजी महाराजांच्या हाती आले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राम मंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. दिनांक ६ जून १६७४ ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १५७६ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला. राज्याभिषेकानिमित्त राजा शिवछत्रपती अशी असलेली होन आणि शिवराई हे दोन नवीन नाणी पाडण्यात आली. राज्याभिषेकाच्या समयी मुख्य प्रधान (पेशवा), अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री व सुमंत अशी अष्टप्रधानांची नियुक्ती केली. शिवाजी महाराजांनी लष्कराला वेतन देण्याची पद्धत सुरू केली. शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृत श्लोकबद्ध असून ती: "प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो:शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते" अशी आहे. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला. अशा या महान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवेढा बसस्थानकावर उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री सिधदेश्वर आवताडे तसेच आगार व्यवस्थापक श्री. संजय भोसले, वाहतूक निरीक्षक श्री योगेश गवळी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री रावसाहेब चव्हाण तसेच सौ. संज्योत भोसले ह्या आवर्जून उपस्थित होत्या. तसेच वरिष्ठ लिपिक अमोल काळे, परमेश्वर भालेकर, धनाजी पाटील, उमेश ननवरे, भिमराव कदरकर, सचिन माने, वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण, श्रीमती सविता काटकर,कीर्ती घंटे, वेदिका सूर्यवंशी, सागर माने, वाहक लोखंडे, सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक श्री साहेबराव इंगोले, सिद्धेश्वर पवार, संघटना प्रतिनिधी श्री अनिल बेदरे, अमोल बड्डे, गणेश गवळी, गणेश हजारे तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी अभय बंडगर, समर्थ गवळी हे उपस्थित होते.
0 Comments