Hot Posts

6/recent/ticker-posts

संपूर्ण जगासमाेर जागतिक तपमान वाढीचे संकट व त्यावर प्रभावी उपाय.

Jagdish Kore पत्रकार: नवी दिल्ली: प्रतिनिधी
संपूर्ण जगासमोर आणि मानवी अस्तित्वासमोर जागतिक तापमान वाढीचे संकट उभे असताना त्यावरचा प्रभावी उपाय म्हणून वृक्षसंवर्धनाकडे पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर सन 2021 पासून सन 2023 पर्यंत महाराष्ट्रातील आणि एकूणच भारतातील वनसंपदेत वाढ होत असल्याचे विधायक चित्र दिसून आले आहे. 

इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 या अहवालात सन 2021 पासून सन 2023 पर्यंत भारतातील वनक्षेत्रामध्ये तब्बल 1445 चौरस किलोमीटरने वाढले आहे. वनक्षेत्र वाढविण्यामध्ये मध्य प्रदेश आघाडीवर असून अरुणाचल प्रदेश दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

 केंद्रीभूपेंद्र भूपेंद्र यादव यांनी ही समाधान वाढवणारी माहिती सभागृहात बोलताना दिली आहे. भारतीय वन सर्वेक्षणाच्या वतीने हा अहवाल सादर करण्यात येतो. अहवालात नमूद केल्यानुसार भारतात वन आणि वृक्ष क्षेत्र ८,२७,३५७ चौ. किमी (देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २५.१७%) आहे. यामध्ये वन क्षेत्र ७,१५,३४३ चौ. किमी (२१.७६%) असून वृक्ष क्षेत्र १,१२,०१४ चौ. किमी (३.४१%) आहे.

जागतिक तापमान वाढीने मानवी अस्तित्वावर आणि पृथ्वीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे दुष्काळ, अवकाळी पाऊस, पूर, बेभरवाशी हवामान अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पृथ्वीवरील वृक्षांचे आवरण जागतिक तापमान वाढीला आळा घालण्यासाठी प्रभावी ठरू शकते असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन यावर सध्याच्या काळात भर दिला जात आहे. भारत आणि याबाबतीत पुढाकार घेतल्याचे या अहवालातील आकडेवारीवरून दिसून येत आहे. हे चित्र आश्वासक असून ही वाटचाल अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने याबाबतीत पुढाकार घेणे आवश्यक आहे. 

Post a Comment

0 Comments